Friday, May 6, 2011

सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आज अक्षय तृतीया,

पिकलेल्या हापूस आंब्याची अवीट गोडी घेण्याचा मुहूर्त !

सोने, चांदी आणि स्थावर मालमत्ता खरेदी मुहूर्त !

आपल्या शाळेच्या काळात सुट्टीचे १५ - २० दिवस निघून जाऊन पुन्हा आपल्या मित्रांचे आणि मैत्रिणींची आठवण यायला सुरवात होणारा काळ !

आजही त्या आठवणी ताज्या आहेत आणि असतात पण काळाच्या ओघात आणि धकाधकीच्या आयुष्यात विसराला होणाऱ्या आठवणी जणू ताज्या होतात ते केवळ ह्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे !

अगदी १९७५ पासूनच्या सुनील गोगटे पासून सर्व दरवर्षी होणाऱ्या वर्षातील दोन भेटींना येत राहिले आणि आता फेसबुक ग्रुपवर तर शैलेश कामत ( १९७८), प्रसाद जोशी ( १९९०) आणि मंदार पाटणकर (१९८८) आदींनी जगभरातून " फक्त वामुमावि च्या १९७५ पासूनच्या माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनीसाठी" ग्रुप साठी मित्र - मैत्रिणी जोडले.

विसरू नका ! १९७५ पासून दरवर्षी निदान ५० जण तरी संगणक जाणारे अथवा दरवर्षीच्या संख्येपैकी ३० जण तरी इंटरनेट शी जोडले असतील तेह्वा "१००१" सदस्य संख्या होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अनेक जणही वैयक्तिकरित्या अनेक वर्गमित्रांना आणि वर्गमैत्रीणीना जोडत आहेत,जोडत राहतील अशी खात्री आहे.

तेव्हा आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

No comments: